उदासीचा रंग

[वाचनकाल : मिनिटे
 
वाऱ्यावर उधळलेले रंग, colours splattered due to wind
आनंदाची चाल, दु:खाची चाल, शौर्याची चाल, विरहाची चाल अशा अनेक स्वररचना करता करता एक दिवस ‘घुसमट’ स्वरबद्ध झाली.

आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणाऱ्या पाण्याचा पांढरा रंग, फांदीवर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे रंग, फुलाभोवती गुंजन करणाऱ्या भुंग्यांचे रंग, बागेत बागडणाऱ्या चिमुकल्या फुलपाखरांचे रंग, आपल्या अवती भवती ही रंगाचीरंगपंचमीनेहमीच फुलत असते. प्रत्येक रंगाला एक अर्थ असतो. अशाच रंगांचे त्यांच्या अर्थांशी जोड्या लावताना सापडला, तो उदासीचा रंग . . . 
 
आपल्या आयुष्यात अनेक रंग आहेत. समृद्धीचा रंग-हिरवा, शांततेचा-पांढरा, प्रेमाचा-गुलाबी, राग किंवा क्रोधाचा-लालबुंद, दु:खाचा-काळा, बालपणाचा-सप्तरंगी!’ स्वत:शीच बोलत होते. भावना आणि रंग यांच्या जोड्या लावत होते. डोळे मिटले आणि व्यथा समोर आली की अंधार दिसतो. काळाकुट्ट! त्यात कुठेतरी शक्यता वाटते, की हा अंधार संपून लख्ख प्रकाश दिसेल. पण . . . पण . . . उदासीचा रंग कोणता? पूर्ण प्रकाश नक्कीच नाही. पण अंधारपण नाही. नुसताच गढूळ रंग. अस्पष्ट . . . अव्यक्त . . अर्धवट . . . श्वास घेतेय, पण पुरत नाहीये अशा अवस्थेतला रंग.
संदीप खरेंच्या कवितेमधल्या या ओळी गेली अनेक वर्ष पाठ आहेत, पण काही माणसं आणि काही ओळी वाचत राहूनसुद्धा समजत नाहीत . . .
 
उदासीत या कोणता रंग आहे?
तुला ठाव नाही, मला ठाव नाही
जसा की नदीच्या तटी मी प्रवासी
तुला रंग नाही, मला गाव नाही।
 
कवितेच्या घरापाशी खूप वेळ थांबलं, स्वत:शी प्रत्येक शब्द घोळवत राहिलं, की मग एका क्षणाला तिचं दार उघडतं आणि मग कागदापलीकडची कविता दिसू लागते. एकदा रंग सापडला की सुरात ती गुणगुणणं हा तर केवळ सोपस्कार. तिचे अंतरंग अनुभवणं म्हणजे भाग्य! विजय तेंडुलकरांच्यामित्राही लघुकथा वाचताना मला याउदासीचा रंग सापडला. ‘मित्राची घुसमट, तिचा संघर्ष आणि मग कायमचीउदासीनता’! अशी कित्येक माणसं आठवत गेलीज्यांना तसं कागदावर लिहून दाखवता येईल असं दु: नाही; पण एक कायमचा शाप असावा अशीउदासी’ . . . असा एकटेपणा . . .
आनंदाची चाल, दु:खाची चाल, शौर्याची चाल, विरहाची चाल अशा अनेक स्वररचना करता करता एक दिवसघुसमटस्वरबद्ध झाली . . . त्याउदासी खूप काही सापडलं. दु:खी माणसांना एक थेट उपाय असतो ना? की कर्ज झालंफेडून टाका, एकटेपणा - मिटवून टाका, अपयशखोडून टाका आणि कोंडीमोडून टाका! आजाराचं थेट निदान व्हावं तसं दु:खाचं होतं. पण खोल खोल रक्तातला एकटेपणा? त्याचं औषध? गर्दीतपण कितीउदासचेहरे दिसतात. संदीप खरेंनी हा रंग पकडला . . .
 
तुला ठाव होते, मला ठाव होते
कधी पार तारू पोहोचायचे
कितीही जरी बोलशी हासुनि तू
किती डोह डोळ्यांत डहुळायचे।
 
अश्रूंची किंमत कळलेला हा माझा मित्र पुन्हा पुन्हा त्या गूढ डोहात घेऊन जातो.
 
अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते।
 
खूप वर्ष घट्ट पकडून ठेवलेला अश्रूंचा बांध अगदी अचानक छोट्याशा प्रसंगात फुटतो, गप्पा मारताना उगाचच भरून येतं, छातीत कसंसंच होतं, आणि मग अचानक गालावर उष्ण पाणी जाणवतं . . . तसं थेट कारण काहीच नसतं; पण वेळोवेळी संयमाने आवरलेले अश्रू असतात हे . . . ‘कुण्या काळचं पाणीअसतं ते . . . खरे होत जातो आपण! उगाच रडू येणं हा कमकुवतपणा आहे, या उथळ विचारांपलीकडे अश्रूंशी मैत्री होते. लहानपणापासून साठवलेले किती सल, किती हंबरडे छातीत कोंडून ठेवतो आपण! पण त्याचा आक्रोश होत नाही; त्याचकुण्या काळचे पाणीडोळ्यांत येते!
सोडवलेले गुंते डोक्यात घेऊन जगणारे आपण सगळे! यांच्या मनाचे कप्पे, त्यातला अंधार बघितला तोमी महाकवी दु:खाचाअसं म्हणणाऱ्या ग्रेसने. ‘जेव्हा अंधारून येतो सारा अतृप्त पसाराअसं जेव्हा ग्रेसच्या पुस्तकात वाचलं तेव्हा मनात खळबळ झाली. कित्येक संदर्भ, वाक्यं, संवाद, नाती अर्धवट टाकून आपण पुढे-पुढे चालत असतो. एखाद्या संध्याकाळी आपण एकटेच घरात असताना हा सगळाअतृप्त पसाराअंगावर येतो, प्रश्न विचारतो, जाब विचारतो. आपण निरुत्तर! तरीही उद्याकडे चालणारे . . . वास्तववादी? की कोडगे?
रडकी मुलं हळूहळू मोठी झाली की शहाणी होतात. यशस्वीही होतात. आणि हळवी मुलं? बहुधा कलाकार होत असावीत! त्यांना जरा जपावं लागतं. म्हणजेकलाकारम्हणून वावरणं वेगळं; आणि कलाकार म्हणूनजगणंवेगळं. मुलाखती देणं खूपच सोपं; पण संवाद साधणं अवघड! कविवर्य ग्रेस म्हणतात
 
मोरांना कळते वेळ, पण
कोकिळ असते हळवे
 
दोन्ही कलाकारच . . . पण एकाला सौंदर्याची जाणीव आहे. पाऊस पडल्यावर आपला पिसारा, त्याची गाणी, त्याची चर्चा याची जाणीव आहे त्याला. जसं काही कलाकारांच्या मनात काय करायचं, कसं करायचं याआधीचते कसं बघितलं जाईल, याची तगमग असते. आणि दुसरे हळवे कोकिळ. कदाचित अवेळी, अयोग्य जागी व्यक्त होणारे. कधी लपून राहणारे. पण असतात कलाकारच! मोरही आवडतो सगळ्यांना आणि कोकिळही. पणकोकिळ असते हळवे’ . . . त्याला गोष्टी जास्त जाणवतात, त्रास देतात. त्याचा आनंदही वेगळा आणि एकटेपणाही!
दिवसेंदिवस अशा एक-एक ओळी वाचत तानपुऱ्याचा षड्ज-पंचम ऐकत बसणं ही माझी अनेक वर्षांची सवय! आणि मग खूप वर्ष एकत्र राहून एकमेकांशी काहीही बोलता सारं समजतं, तशा त्या ओळींमध्ये लपलेल्या गोष्टी, रंग आणि उसासेही जाणवतात. कवीच्या शब्दांपलीकडे कागदावर खूप काही असतं . . . त्या कवीचं बालपण, एकटेपणा, संघर्ष, हळवेपणा . . . आणि या सगळ्याइतकंच खरं असणारंमाणूसपण’! ते शोधत बसते मी तासन् तास . . . 
 
जे सोसत नाही असले
तू दु: मला का द्यावे?
 
गेले तीन महिने मनात घोळत असलेल्या या ग्रेसच्या ओळी रोज एकटी गाते. कुणालाच ऐकवाव्याशा वाटल्या नाहीत अजून. कारण माझा संवाद तर पूर्ण व्हायला हवा त्या ओळींशी! मग मी कोणाला तरी सांगू शकेन, की असं म्हणायचंय या रंगांना.
दु: मिळणारच प्रत्येकाला. ‘जरामरण यातून सुटला कोण प्राणिजात?’ असं माडगूळकरांनी सांगितलंय. पण माझ्या कुवतीपलीकडे का देतोस मला दु:? माझी तक्रार तिथे आहे, की सामान्य दु:खाची तयारी होतीच माझी; पणजे सोसत नाहीअसं दु: मलाच का द्यावंसं वाटलं? मी सगळ्यांचे रोष, आरोप, त्रागा पचवून जेव्हा दूर निघून गेले तेव्हा . . .
 
परदेशी आपुल्याघरचे
माणूस जसे भेटावे
जे सोसत नाही असले
तू दु: मला का द्यावे?
 
हाच तोउदासीचा रंग’ . . . सोसायलाही अवघड आणि शब्दांत, सुरांत मांडायलाही. खूप जोरात ओरडावं आणि हाक पोहोचूच नये, तशी अगतिकता तशी पोकळी . . . हा रंग जितका शोधू तितका जंगलात खोल खोल आपला हात धरून घेऊन जाणारा आणि सापडला म्हणता म्हणता निसटणारा. गडद, तरीही हळवा; जणू मारवा!
 
पडवीच्या देखाव्यातून दिसतात मठाचे खांब
क्षितिजाच्या जवळी जाता ते पुन्हा पसरते लांब!
जे सोसत नाही असले
तू दु: मला का द्यावे?
 
 
 लेखनजान्हवी
 

संदर्भ :
) छायाचित्र : टाकबोरू
 
वाचत रहा :

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال